‘एआय’च्या लाटेत करिअरची दिशा ठरवा! – अच्युत गोडबोले

येत्या पाच वर्षांत सर्वच क्षेत्रांचे चित्र बदलेल; अच्युत गोडबोले यांचा विद्यार्थ्यांना इशारा

कोपरगाव वृत्तवेध:

तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड वाढला असून कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ आता केवळ तंत्रज्ञान क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. येत्या पाच वर्षांत एआयमुळे सर्वच क्षेत्रांचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयला केवळ नवीन तंत्रज्ञान न मानता भविष्यातील संधी म्हणून स्वीकारावे आणि त्याचा प्रभावी वापर आत्मसात करावा, असे प्रतिपादन प्रख्यात तंत्रज्ञान अभ्यासक व लेखक अच्युत गोडबोले यांनी केले.


संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी तसेच एमबीएच्या प्रथम वर्षातील नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत व मार्गदर्शन समारंभात गोडबोले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे होते.


ग्रामीण विद्यार्थ्यांना ‘लोकल टू ग्लोबल’ची दिशा
डॉ. आर. ए. कापगते यांनी स्वागतपर भाषणात संजीवनीचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी रुजविलेल्या दूरदृष्टीपूर्ण विचारांचा वारसा संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे पुढे नेत असल्याचे सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देत ‘लोकल टू ग्लोबल’ हा संकल्प प्रत्यक्षात साकार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.


यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे, डॉ. आर. ए. कापगते, डॉ. डी. बी. क्षिरसागर, डॉ. ए. बी. पवार, डॉ. व्ही. एम. तिडके आदी उपस्थित होते.

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या