सरकारी कर्मचाऱ्याला खोट्या प्रकरणात गोवल्याचा ठपका; वैद्यला ३ वर्षे सश्रम कारावास.

१५ हजारांचा दंड; दंड न भरल्यास चार महिने अतिरिक्त कारावास | उलट तपासातील कबुलीजबाब ठरले महत्त्वाचे

कोपरगाव वृत्त वेध:

सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध लाच मागितल्याची तक्रार करून त्याला कथितरीत्या खोट्या प्रकरणात गोवल्याच्या प्रकरणात कोऱ्हाळे (ता. राहाता) येथील शंकर रावसाहेब वैद्य यांना दोषी ठरविण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी संजय खैरनार यांनी २ सप्टेंबर २०२६ रोजी वैद्य यांना तीन वर्षे सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी चार महिने कारावास भोगावा लागणार आहे.


या बाबींचा विचार करून तत्कालीन सत्र न्यायालयाने सरकारी कर्मचाऱ्याची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने त्याला खोट्या प्रकरणात गोवल्याचा निष्कर्ष नोंदविला. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार तत्कालीन कोर्ट अधीक्षक भरतसिंग परदेशी यांच्या फिर्यादीवरून वैद्य यांच्याविरुद्ध स्वतंत्र खटला दाखल करण्यात आला.


न्यायालयीन पुरावे ठरले निर्णायक
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादीची साक्ष, सत्र न्यायालयातील निकाल व त्यातील निष्कर्ष तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद यांचा विचार करून अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी संजय खैरनार यांनी वैद्य यांना दोषी ठरविले.
या निकालातून न्यायालयीन प्रक्रियेत तक्रारदाराच्या जबाबातील विसंगती, कबुलीजबाब आणि उपलब्ध पुरावे किती महत्त्वाचे ठरतात, हे अधोरेखित झाले आहे.सरकार पक्षातर्फे सरकारी वकील प्रदीपकुमार धोंडीबा रणधीर यांनी कामकाज पाहिले.

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या