अण्णाभाऊंचे विचार डोक्यात घ्या; कष्ट, स्वाभिमानाने पुढची पिढी घडवा : गिरीश महाजन

कोपरगावात अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण; भरपावसात राजकीय एकजूट, युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश

कोपरगाव | वृत्तवेध :

“अण्णाभाऊ साठे हे केवळ लोकशाहीर नव्हते, तर कष्टकरी, शोषित, पीडित आणि वंचितांच्या वेदनांना शब्द देणारे महान साहित्यिक होते. माणूस उंचीने नव्हे, तर कर्तृत्व, कष्ट आणि स्वाभिमानाने मोठा होतो. युवकांनी व्यसनांची नव्हे, तर व्यायाम, कर्तृत्व आणि परिश्रमाची स्पर्धा करावी,” असे प्रतिपादन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

‘अण्णाभाऊंचे विचार आचरणात आणा’

अवघे दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी आपल्या कर्तृत्वाने साहित्यविश्वात अमीट ठसा उमटविला. कष्टकरी माणसाचा आवाज त्यांनी साहित्याच्या माध्यमातून बुलंद केला. त्यांच्या साहित्याचा विविध भाषांमध्ये अनुवाद झाला असून परदेशातील विद्यापीठांमध्येही त्यांच्या कार्याचा अभ्यास केला जातो.

“कष्ट करण्याची तयारी असेल तर अशक्य असे काहीच नाही. महापुरुषांच्या जयंती केवळ उत्सवापुरत्या मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांचे आचरण झाले पाहिजे,” असे महाजन म्हणाले. युवकांनी गुटखा, तंबाखू यांसारख्या व्यसनांपासून दूर राहावे. कठोर परिश्रम, सुसंस्कार आणि स्वाभिमानाने जगणारी पिढी घडविणे हीच अण्णाभाऊंना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

‘कोपरगावच्या रस्त्यांकडे आता लक्ष देतो!’

‘महापुरुषांना डोक्यावर नव्हे, डोक्यात घ्या’

गोदावरी नदीकाठचा घाट, पूरसंरक्षण भिंत, पुणतांबा घाटाचा विकास तसेच पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळविण्याची दीर्घकालीन मागणी त्यांनी महाजन यांच्यासमोर मांडली. समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविल्यास नाशिक, अहिल्यानगर आणि मराठवाड्याच्या सिंचनाला मोठा फायदा होईल, असा मुद्दाही त्यांनी मांडला.

‘स्मारक केवळ पुतळा नाही, प्रेरणास्थळ’

सचिन साठेंचा आरक्षण वर्गीकरणावर एल्गार

अण्णाभाऊंचे नातू सचिन साठे यांनी अण्णाभाऊंचे साहित्य हे वंचित, शोषित आणि कष्टकरी माणसाच्या दुःखाचा आवाज असल्याचे सांगितले. विविध समाजघटकांतील सामान्य माणसाला अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याचा नायक बनविले.

“अण्णाभाऊंच्या विचारांचे खरे वारसदार व्हायचे असेल तर वंचितांना न्याय मिळवून देण्याची लढाई लढली पाहिजे,” असे सांगत त्यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील वर्गीकरणाचा मुद्दा महाराष्ट्रात मार्गी लावण्याची मागणी केली.

चौकट : भरपावसातही अण्णाभाऊंच्या विचारांना सलाम!

पुतळ्याचे अनावरण होताच पावसाला सुरुवात झाली. मात्र पावसाची तमा न बाळगता नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिले. भरपावसातील ही उपस्थिती सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली.

चौकट : राजकीय मतभेद बाजूला

अण्णाभाऊंच्या लोकार्पण सोहळ्यात विविध राजकीय प्रवाहांतील नेते एकाच व्यासपीठावर आले. बिपिनदादा कोल्हे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे आणि सचिन साठे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. खासदार वाकचौरे यांनीही मतदारसंघातील विकासकामांच्या मागण्या महाजन यांच्याकडे मांडल्या.

नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्वागत केले. मुख्याधिकारी अजित निकत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन भावना गवांदे यांनी केले, तर विनोद राक्षे यांनी आभार मानले.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या