एनसीएमसीचा तांत्रिक घोळ; ज्येष्ठ-महिलांच्या खिशाला कात्री!

कार्ड मिळाले नाही म्हणून अर्ध्या तिकिटाची सवलतही बंद; कोपरगाव मतदारसंघातील जवळपास ५० टक्के पात्र लाभार्थी अद्याप प्रतीक्षेत, आ. आशुतोष काळे यांची परिवहन मंत्र्यांकडे मुदतवाढीची मागणी

कोपरगाव वृत्त वेध:

सवलत जाहीर झाली; पण सवलतीचे कार्डच वेळेत मिळाले नाही… मग त्याचा आर्थिक भुर्दंड लाभार्थ्यांनी का सोसावा? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले आहे. मात्र कार्ड नोंदणीच्या प्रक्रियेत अपुरी यंत्रणा, नेटवर्कचा घोळ आणि अंगठ्याचे ठसे न जुळण्याच्या तक्रारींमुळे कोपरगाव मतदारसंघातील जवळपास ५० टक्के पात्र लाभार्थी अद्याप कार्डच्या प्रतीक्षेत आहेत.

कार्ड नाही म्हणून सवलतही नाही! परिणामी पूर्वी अर्ध्या तिकिटात प्रवास करणाऱ्या पात्र ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना आता पूर्ण भाडे मोजावे लागत असल्याने त्यांच्या खिशावर थेट अतिरिक्त भार पडत आहे.

‘कार्ड मिळेपर्यंत सवलत तरी सुरू ठेवा!’

सवलत कागदावर; प्रत्यक्षात पूर्ण भाडे!

१ सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य झाल्याने कार्ड नसलेल्या पात्र ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना पूर्ण तिकीट काढावे लागत आहे.

यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांची अडचण वाढली आहे. नोकरी, शिक्षण, उपचार, बाजारपेठ तसेच शासकीय कामांसाठी नियमित शहराकडे ये-जा करणाऱ्या महिलांना पूर्वीच्या सवलतीच्या तुलनेत आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

सवलत देण्याची घोषणा झाली; मात्र ती मिळविण्यासाठी आवश्यक कार्डच वेळेत मिळत नसेल, तर कार्डच्या विलंबाची किंमत लाभार्थ्यांनी का मोजायची? हा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.

अंगठा जुळत नाही, नेटवर्क साथ देत नाही!

एनसीएमसी कार्ड नोंदणीच्या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी समोर येत आहेत.

  • अंगठ्याचे ठसे जुळत नसल्याच्या तक्रारी
  • काही केंद्रांवर नेटवर्कची समस्या
  • नोंदणीसाठी अपुरी यंत्रणा
  • कार्ड तयार होण्यास विलंब
  • ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना वारंवार केंद्रावर हेलपाटे

या अडचणींमुळे पात्र असूनही सवलतीपासून वंचित राहण्याची वेळ ज्येष्ठ नागरिक आणि महिलांवर आली आहे.

ग्रामीण महिलांची दुहेरी कोंडी

आ. काळे यांचा परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा

एनसीएमसी कार्डची नोंदणी व वाटप प्रक्रिया सुरू असली तरी तांत्रिक आणि वैयक्तिक अडचणींमुळे हजारो पात्र लाभार्थ्यांना अद्याप कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांना कार्ड काढण्यासाठी पुरेसा अतिरिक्त कालावधी द्यावा आणि कार्ड प्रत्यक्ष मिळेपर्यंत पूर्वीची प्रवास सवलत कायम ठेवावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.

वृत्तवेध विशेष | ‘सवलत’ कुठे गेली?

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या