युरियाची साठेबाजी खपवून घेणार नाही; शेतकऱ्यांना खतासाठी हेलपाटे मारू देणार नाही – आ. आशुतोष काळे

कोपरगाव वृत्तवेध :
पावसाने उशिरा का होईना साथ दिल्यानंतर आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पेरण्या पूर्ण केल्या आहेत. आता पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात असताना युरियासह रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण होऊ देणार नाही. युरियाची साठेबाजी, कृत्रिम टंचाई आणि शेतकऱ्यांची पिळवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. खत पुरवठ्यावर माझे स्वतःचे लक्ष राहील, असा स्पष्ट इशारा आमदार आशुतोष काळे यांनी दिला.


कोपरगाव व राहाता तालुक्यातील रासायनिक खत विक्रेते, कृषी सेवा केंद्र चालक आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.


शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ
आ. काळे म्हणाले की, जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पावसाची अनिश्चितता आणि आर्थिक अडचणी असूनही शेतकऱ्यांनी नफा-तोट्याचा विचार न करता पेरण्या पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आता या पिकांना आवश्यक असलेले युरियासह सर्व रासायनिक खते वेळेत उपलब्ध करून देणे ही कृषी विभाग आणि खत विक्रेत्यांची संयुक्त जबाबदारी आहे.


कृत्रिम टंचाईला आळा घालण्याच्या सूचना
मतदारसंघातील पेरण्या, पिकांची स्थिती आणि खताची मागणी याचा नियमित आढावा घेऊन गरजेनुसार अतिरिक्त खतसाठा उपलब्ध करावा. युरियाची साठेबाजी, कृत्रिम टंचाई किंवा जादा दराने विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही, यासाठी कृषी विभागाने प्रभावी तपासणी करावी. शेतकऱ्यांना खतासाठी विनाकारण हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी नियोजनबद्ध पुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या