११० विहिरींच्या प्रस्तावांना मंजुरी द्या; शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवा – आ. आशुतोष काळे

कोपरगाव वृत्तवेध:

गेल्या वर्षीच्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीत कोपरगाव मतदारसंघातील २४२ सिंचन विहिरी खचल्या व बुजल्या. महसूल विभागाने प्रत्यक्ष पंचनामे व सर्वेक्षण करून नुकसानभरपाईसाठी २४२ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले. मात्र, यापैकी केवळ १३२ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून ११० प्रस्तावांना मंजुरी न मिळाल्याने आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


सिंचनाचा प्रश्न कायम
विहिरी खचणे व बुजल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे मोठे संकट उभे राहिले आहे. नुकसानभरपाई मिळाल्यास विहिरींची दुरुस्ती करून शेती पुन्हा पूर्वपदावर आणण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे. त्यामुळे उर्वरित ११० प्रस्तावांना मंजुरी देण्याचा निर्णय प्रशासनाने तातडीने घ्यावा, अशी अपेक्षा बाधित शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या