आषाढी एकादशीला शिर्डीत भक्तिसागर उसळला; साईप्रसादालयातील महाप्रसादाचा तब्बल ४५ हजार भाविकांना लाभ

शिर्डी | वृत्तवेध
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री साईबाबा संस्थानात भक्तिभावाचा महासागर उसळला. देशभरातून शिर्डीत दाखल झालेल्या हजारो साईभक्तांनी समाधी दर्शन, आरती, पालखी सोहळा आणि साईप्रसादालयातील महाप्रसादाचा लाभ घेतला.


आषाढी एकादशी हा श्री साईबाबांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. साईबाबांनी त्यांचे परमभक्त दासगणू महाराजांना भगवान विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिल्याच्या परंपरेचे स्मरण करत हा स्थानिक उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदाही श्री साईबाबांच्या समाधी चौथऱ्यावर भगवान विठ्ठलाची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती. संपूर्ण समाधी मंदिर आणि परिसर आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता, तर धूप आरतीवेळी विठ्ठलाची पारंपरिक मराठी आरती गाऊन भक्तिमय वातावरण निर्माण झाले.


उत्सवानिमित्त ह.भ.प. दिगंबर महाराज बोरसे (राहाता) यांच्या कीर्तनाने भक्तांना अध्यात्मिक मेजवानी मिळाली. त्यानंतर श्रींच्या पालखीची शिर्डी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि साईनामाच्या जयघोषात निघालेल्या पालखी सोहळ्याने संपूर्ण शिर्डी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या