गोदावरीतील वाळूचोरांवर पोलिसांचा घणाघात!

Vrittvedh News | कोपरगाव | ६ ऑगस्ट २०२६
गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर कोपरगाव शहर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर कारवाई करत वाळूमाफियांना जोरदार दणका दिला आहे. बुधवारी (५ ऑगस्ट) सकाळी डाऊच खुर्द शिवारात करण्यात आलेल्या धडक कारवाईत सुमारे ₹५.०५ लाखांचा विना क्रमांकाचा स्वराज ७४४ एफई ट्रॅक्टर-ट्रॉली आणि एक ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात आली.


या कारवाईत रिंकू सतीश माळी याला ताब्यात घेण्यात आले असून, तेजस गुरसळ याच्यासह अन्य संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोदावरी नदीपात्रातून शासकीय मालकीच्या गौण खनिज वाळूचे अनधिकृत उत्खनन करून चोरीछुप्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.


वृत्तवेध विश्लेषण
गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसा हा केवळ महसूल चोरीचा विषय नसून पर्यावरणासाठीही गंभीर धोका ठरत आहे. अलीकडील कारवायांमुळे प्रशासनाने वाळूमाफियांवरील फास आवळण्यास सुरुवात केली असली, तरी या अवैध व्यवसायामागील संपूर्ण साखळी उघड होणे आवश्यक आहे. केवळ वाहन जप्तीपुरती कारवाई न राहता, उत्खननाला आर्थिक पाठबळ देणाऱ्या सूत्रधारांपर्यंत तपास पोहोचणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या