अजून किती बळींची वाट पाहणार? मोकाट जनावरांवरून आमदार काळे संतप्त

कोपरगाव वृत्तवेध:

शहरातील मोकाट जनावरांचा वाढता वावर आता नागरिकांच्या जीवितासाठी गंभीर धोका ठरत आहे. रस्त्यांवर ठाण मांडून बसणारी जनावरे, अचानक वाहनांसमोर येणारे कळप आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे आतापर्यंत दोन नागरिकांना जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार आशुतोष काळे यांनी सोमवारी (दि. १७) कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांच्यासमवेत बैठक घेतली.

यावेळी “अजून किती बळी जाण्याची वाट पाहणार?” असा उद्विग्न सवाल करीत त्यांनी प्रशासनाला मोकाट जनावरांच्या प्रश्नावर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.


शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा तसेच शाळा-महाविद्यालय परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक ठिकाणी जनावरे रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडून बसत असल्याने वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावा लागतो. कळप अचानक रस्त्यावर आल्याने अपघाताचा धोका वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष द्या
मोकाट जनावरांचा बंदोबस्त काही दिवसांच्या कारवाईपुरता मर्यादित न ठेवता त्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याच्या सूचना आमदार काळे यांनी दिल्या. प्रमुख रस्ते, बाजारपेठा, चौक तसेच शैक्षणिक परिसरात विशेष लक्ष देऊन मोकाट जनावरे पकडावीत आणि ती पुन्हा रस्त्यावर येणार नाहीत, याची प्रभावी व्यवस्था करावी, असे त्यांनी सांगितले.


नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन मोकाट जनावरांचा प्रश्न तातडीने निकाली काढा, अशा स्पष्ट सूचना आमदार आशुतोष काळे यांनी मुख्याधिकारी अजित निकत यांना दिल्या.

आपले मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.
ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी बातमी शेअर करा.अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या