कुंभमेळ्यापूर्वी कोपरगावला विकासाचा ‘बूस्टर’! काळेंच्या तीन मागण्या मुख्यमंत्र्यांकडे

कोपरगाव वृत्तवेध:

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पौराणिक महत्त्व असलेल्या कोपरगावमध्ये देशभरातून येणाऱ्या साधू-संत आणि भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून रस्ते, घाट आणि प्रवासी सुविधांसाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याशिवाय फळबाग उत्पादक सहकारी संस्थांतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणीही त्यांनी केली.


रेल्वे स्थानकावर सुविधांचा आग्रह
कोपरगाव बसस्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते, स्वच्छतागृहे, विश्रामगृह, सुसज्ज प्रतीक्षालय आणि अन्य प्रवासी सुविधांचा विकास करण्याची गरजही काळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.


फळबाग शेतकऱ्यांसाठीही कर्जमाफीची मागणी
कोपरगाव मतदारसंघातील काही फळबाग उत्पादक सहकारी संस्थांमधील पात्र शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. या संस्था जिल्हा सहकारी बँकेच्या सभासद असून नियमित कर्जफेड करणाऱ्या आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या संस्थांचा कर्जमाफी योजनेत समावेश करावा, अशी मागणी आमदार काळे यांनी केली.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या