महिलांनी हक्कांची जाणीव ठेवून अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहावे : ॲड. राजश्री शिंदे

कोपरगाव : महिलांनी आपल्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्कांची माहिती करून घेत कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवला पाहिजे, असे प्रतिपादन ॲड. राजश्री शिंदे यांनी केले.

स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि अंतर्गत महिला तक्रार निवारण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महिलांचे कायदेशीर हक्क आणि सुरक्षितता’ या विशेष व्याख्यानात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. विजय ठाणगे होते.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अंतर्गत महिला तक्रार निवारण कक्षाच्या प्रमुख डॉ. सुरेखा भिंगारदिवे यांनी विद्यार्थिनींमध्ये कायदेशीर साक्षरता, सुरक्षिततेची जाणीव आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.


प्रा. सायली भावसार यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. वर्षा आहेर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. नीता शिंदे, प्रा. खंडीझोड, प्रा. वहाडणे, प्रा. वाकचौरे, प्रा. हर्षदा गवळी, प्रा. कर्डिले आणि प्रा. घुगे यांचे सहकार्य लाभले.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या